Sitaphal Diseases । आपल्याकडे अनेक शेतकरी सध्या फळबाग लागवड करताना दिसत आहेत. फळबाग लागवडीतून चांगला नफा मिळतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणून अनेक शेतकरी याची लागवड करतात. सरकार देखील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान देत आहे. मात्र फळबाग लागवड केल्यानंतर वातावरणातील बदलांमुळे फळांचे देखील मोठे नुकसान होत असते. यामध्ये सीताफळाचा जर आपण विचार केला तर वातावरणातील बदल, अनियमित पाऊस, यामुळे सीताफळाची फळे देठाजवळ काळे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा फळांना बाजारात दर देखील कमी मिळतो. (Sitaphal Diseases)
सिताफळ हे कोरडवाहू आणि बांधावरील सर्व प्रकारच्या जमिनीत येते. अत्यंत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना यामधून चांगला नफा मिळतो. मात्र अलीकडच्या काळात वातावरणात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. नैसर्गिक चित्र चक्र बिघडत असल्याचे आपल्याला दिसत आहे. दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी जास्त होत आहे. त्यामुळे सीताफळ काळे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा फळांना बाजारात देखील दर कमी मिळतोय त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सीताफळ काळे पडण्याचे कारण लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
उपाययोजना
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळबाग लागवड करण्याअगोदर बागेतील जमिनीची नांगरणी आणि खाणणी करावी. यामध्ये जमीन चांगली तापून द्यावी जेणेकरून जमिनीतील रोग आणि किडींच्या अवस्था नष्ट होतील आणि आपल्या पिकांवर याचा प्रादुर्भाव होणार नाही.
- शेतकऱ्यांनी बागेमध्ये स्वच्छता राखावी. नियोजनबद्ध एकात्मिक खत व पाणी व्यवस्थापन करावे
- सिताफळाला बहराचे पाणी देण्यापूर्वी किंवा पावसाळ्यापूर्वी पाणी देण्यासाठी झाडाभोवती वाफे करून सेंद्रिय व रासायनिक खतांच्या शिफारिशप्रमाणे मात्रा द्यावेत. यामुळे झाडांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- ज्यावेळी आपण झाडाची छाटणी करत असतो त्यावेळी झाडावरील रोगग्रस्त फळेमी फांद्या, पाने छाटून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
- बागेतील जमिनीत कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे झाडावरील फळे काळी पडतात. यामुळे माती परीक्षण करून त्यानुसार कॅल्शियम युक्त रासायनिक खतांचा वापर करावा.