Havaman Andaj । सध्या आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन सगळीकडे झाले आहे. बाप्पाच्या आगमना सोबतच शेतकऱ्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात गणरायाच्या आगमनाबरोबर पावसाने हजेरी लावली आहे. काल राज्यातील अनेक भागात पाऊस झाला आहे. त्यानंतर आता राज्यातील काही भागांमध्ये पुढचे चार ते पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 24 सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रसह गुजरात आणि ओडिसामध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला असला तरी राज्यातील अजूनही काही जिल्ह्यांमध्ये म्हणावा असा पाऊस पडला नाही. यामुळे या ठिकाणची शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
काल रात्रीपासूनच मुंबई या ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर या भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर नाशिक आणि पुण्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून हा पट्टा आता उत्तर पूर्व बंगाल खाडीकडे सरकला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, हवामान विभागाने देशातील काही राज्यात देखील आज पावसाची शक्यता वर्तवली आहे, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागालँड मणिपू,र मिझोरम आणि त्रिपुरामध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 22 सप्टेंबर पर्यंत ही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Onion Rate । लासलगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीत आज कांद्याला किती दर मिळाला? वाचा सविस्तर