Havaman Andaj । सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडत असल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने देखील वर्तवला होता मात्र सप्टेंबर महिना सुरू होऊन 18 दिवस झाले तरी देखील अजून म्हणावा असा पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र आता उद्यापासून गणेशोत्सवाला सुरत होणार आहे. त्यामुळे च्या दिवशी चांगला मुसळधार पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण जास्त असेल तर कोकणात मध्यम ते हलक्या स्वरूपात बसेल असा अंदाज आहे. मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरत असल्याने राज्यात तुरळ ठिकाणी हलक्या सारी कोसळत आहेत.
आज कोकणातील पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित कोकणात धुळे, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
राज्यभर विश्रांती दिलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावायला सुरुवात केली आहे. दोन दिवसापासून राज्याच्या काही भागांमध्ये हलका पाऊस होत आहे तर काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस होत आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस होऊन नदी, नाले दुथडी भरून व्हावेत अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
जर आगामी काळात पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांची पिके नष्ट होतील तसेच काही भागांमध्ये तर सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणची पिके करपली असून काही शेतकरी पिकांना टँकरने पाणी देत आहेत. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी मागणी या शेतकरी करत आहेत.