Raju Shetti । सध्या राज्यभर पावसाने दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पाऊस नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. हवामान खात्याकडून पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आता हा हवामान विभागाचा हा अंदाज खोटा ठरणारा दिसतोय अद्यापही म्हणावा असा पाऊस पडत नाही. आता याच हवामानाच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
हवामान खात्याच्या लहरीपणाच्या अंदाजामुळे शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अचूक हवामान अंदाज नसल्याने शेती धोक्यात येऊ लागली असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. सध्या त्यांचे वक्तव्य चर्चेत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांची राजू शेट्टी यांनी भेट घेतली. यानंतर ते बोलत होते. राजू शेट्टी यांनी विविध विषयांवर डॉ. के. एस. होसाळीकर यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्याचबरोबर अचूक हवामानाचे तंत्रज्ञान विकसित करून हवामान निरीक्षणाचे जाळे वाढवावे लागेल असे देखील राजू शेट्टी म्हणाले आहेत.
Gardening Tips । घराजवळ लावाल ‘ही’ झाडे तर वाढेल सापांचा धोका; वाचा महत्वाची माहिती
परतीचा पाऊस समाधानकारक होणार
सध्या राज्यभर पावसानेओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र राज्यामध्ये परतीचा मान्सून हा समाधानकारक असणार असल्याचे डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राजस्थानपासून सुरू झालेला परतीचा मान्सून राज्यात सर्व दूर होईल असे मत पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केले आहे.
Tomato Pest । अशा प्रकारे करा टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन