Maharastra Rain

Maharastra Rain । ‘या’ जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती अतिशय भयंकर; जास्त किमतीने खरेदी करावा लागतोय हिरवा चारा

पशुसंवर्धन

Maharastra Rain । सध्या राज्यभर पावसाने दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अहमदनगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तर पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण होत चालली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसातच हिरव्या चाऱ्याच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.

Onion Rate । सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला मिळाला ‘इतका’ दर; जाणून घ्या एका क्लिकवर

शेतकऱ्यांना आतापासूनच गुरांसाठी विकत चारा घ्यावा लागत आहे. मात्र अजून काही दिवसांनी विकत चारा मिळणे देखील मुश्किल होणार आहे. त्यामुळे आता तरी शासनाने लवकरात लवकर चारा डेपो सुरू करण्याची मागणी पशुपालक शेतकरी करत आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या मका जळून गेल्या आहेत त्याचबरोबर उसाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे साखर कारखानदारांच्या समोर मोठ्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Soybean Rate । सोयाबीनला आज किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

पंढरपूर बाजार समितीमध्ये दररोज सकाळी हिरव्या चाऱ्याचा मोठा बाजार भरतो. मात्र सध्या या हिरव्या चाऱ्याच्या भावामध्ये वाढ होताना दिसत आहे. सुरुवातीला दोन हजार रुपये टन भावाने मिळणारा चारा आता 5000 रुपये भावाने मिळतोय. त्यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी तर ऊसाला पाणी मिळत नसल्यामुळे ऊस जनावरांना चारा म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे.

Potato Farming । बटाटा लागवडीतून मिळेल लाखोंचे उत्पन्न! जाणून घ्या खर्च कमी करून जास्त नफा कसा मिळवायचा

सध्या हिरव्या चांगल्या उसाला साडेतीन हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. त्यामुळे आता कारखान्याला ऊस देण्यापेक्षा हिरव्या चाऱ्यासाठी ऊस देण्याची मानसिकता शेतकऱ्यांची होऊ लागली आहे. त्यामुळे आगामी काळात साखर कारखानदारांच्या समस्या वाढण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही.

Success Story । तरुणाचा नादच खुळा! सासरच्यांकडून शिकून दोन बिघा शेतात सुरू केली परवलची शेती, महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत कमाई

सरकारने मदत करावी – पशुपालक शेतकऱ्यांना आशा

दिवसेंदिवस हिरव्या चाव्याची किंमत वाढत चालली आहे. त्यामुळे पशुधन कसे जगवायचे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. एकीकडे दुधाला भाव नाही आणि त्याचवेळी दुष्काळामुळे हिरव्या चाऱ्याच्या किमती देखील दुपटीने वाढत चालल्या आहेत. त्यामुळे पशुपालक आता दुहेरी संकटात सापडले आहेत सरकारने काहीतरी मदत करावी अशी आशा आता पशुपालक शेतकऱ्यांना लागली आहे.

Washim News | धक्कादायक! कर्ज फिटत नसल्याने शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन संपवले जीवन

सध्या दुष्काळाची परिस्थिती पाहता सरकारने या मुक्या जनावरांची दया करून तातडीने चारा छावण्या सुरू केल्या तर हे पशुधन वाचणार आहे. अन्यथा अजून काही दिवसात चाऱ्याअभावी जनावरांची परिस्थिती खूपच भीषण बनेल असे पशुपालक सांगत आहेत. सध्या कर्जाने पैसे काढून जनावर वाचवण्याचा प्रयत्न पशुपालक शेतकरी करत आहेत. मात्र काही दिवसांनी ही ताकद देखील संपल्यावर काय करायचे असा सवाल पशुपालक शेतकरी करत आहेत. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे पशुपालकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *