Pm Kisan Yojna । केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. दोन हजाराच्या हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. मागच्या काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा १४वा हप्ता जमा झाला आहे. आता शेतकरी पंधराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता पंधराव्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Pm Kisan Yojna)
सप्टेंबर महिन्याच्या अंतिम तारखेला या योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच ३० सप्टेंबर पूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. मात्र यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेले नाही त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे. जर ई-केवायसी केली नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा रक्कम जमा होणार नाही त्यामुळे तुम्ही यापासून वंचित राहू शकता.
यादीत नाव आहे की नाही अशा प्रकारे तपासा
१५ व्या हप्त्याच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in लॉगिन करावे लागेल या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्यांची यादी असा ऑप्शन दिसेल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तुमच्या नावाचा तपशील भरून सविस्तर माहिती द्या त्यानंतर तुमच्यासमोर यादी येईल आणि त्यामध्ये तुमचे नाव शोधा. योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल.
योजनेला पाच वर्षे पूर्ण
डिसेंबर 2018 मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू केली होती. सुरुवातीला ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती मात्र आता या योजनेचा विस्तार झाला आहे. सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. सध्या अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून या योजनेला जवळपास पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.