Fish Farming

Fish Farming । नादच खुळा! वयाच्या ५८ व्या वर्षी महिला मत्स्यपालनातून कमावते लाखो रुपये; जाणून घ्या कसं केलं जात नियोजन?

शेतीपूरक व्यवसाय

Fish Farming । जर एखादी गोष्ट आपण मनापासून करायची ठरवली तर आपल्याला ती करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आणि आपल्याला त्यामध्ये यश देखील नक्कीच मिळते. अनेक महिला सध्या वेगेवेगळा व्यवसाय करून चांगले पैसे कमावत आहेत. आज आपण उत्तरप्रदेश येतील इसोपूर तेल या ठिकाणच्या रहिवासी श्यामो देवी आणि सुनीता देवी यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. या दोन्ही महिला या बायोफ्लॉक पद्धतीने स्वयंपाकघर सांभाळून तसेच मत्स्यपालन करून दर सहा महिन्यांनी दोन ते तीन लाख रुपये कमवत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे ५८ व्या वर्षी त्या मत्स्यपालन करून एवढे पैसे कमवत आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.

Parbhani News । मोठी बातमी! परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान; उभी पिके गेली पाण्याखाली

एवढेच नाही तर त्या इतर लोकांना मत्स्यपालनाच्या टिप्स देत आहेत त्याचबरोबर रोजगारही उपलब्ध करून देत आहे. इसोपूर तेल येथील रहिवासी श्यामो देवी यांनी सांगितले की, सुमारे तीन वर्षांपूर्वी मत्स्यव्यवसाय विभागाने त्यांच्या जागेवर एक कार्यशाळा आयोजित केली होती, ज्यामध्ये कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मत्स्यशेतीकडे प्रवृत्त केले होते. यामधूनच त्यांना प्रेरणा मिळाली आणि सुमारे अडीच बिघा जमिनीत तलाव उभारल्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालमधून पंगाशियस माशांच्या बिया आणल्या आणि त्याचे संगोपन सुरू केले.

Havaman Andaj । सावधान! राज्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज

पहिल्यांदा पहिल्या हंगामात त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला मात्र त्यांनी यामध्ये खचून न जात यावर मात करत पुन्हा योग्य नियोजनाने व्यवसाय चालूच ठेवला आणि त्यांना हळूहळू चांगले यश मिळाले. आता दर सहा महिन्यांनी दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळत आहे. त्याचबरोबर इतर तिघांनाही या ठिकाणी नोकरी देण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघर सांभाळतो आणि उरलेला वेळ मासेमारीवर जातो.

जिल्ह्यात माशांचे मार्केट नाही, दिल्लीतून माशांचा होतो पुरवठा

शेतकरी श्यामो देवी आणि सुनीता सांगतात की, जवळ शामली येथे कुठेही मासळी मार्केट नाही, त्यामुळे येथे पाळलेली मासळी कंत्राटदारांमार्फत दिल्लीला पाठवली जाते. शामली येथे मासळी मार्केट सुरू झाल्यास येथे मासळी उत्पादकांची संख्या वाढेल, तर कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल. असं त्यांचं म्हणणं आहे.

Soybean Rate । सोयाबीनची बाजारात आज कशी स्थिती आहे? जाणून घ्या आजचे बाजारभाव

जाणून घ्या.. बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन कसे केले जाते

माहितीनुसार, बायोफ्लॉक तंत्रज्ञानामध्ये बायोफ्लॉक नावाचा जीवाणू वापरला जातो. या तंत्रात सर्वप्रथम मासे सिमेंट किंवा जाड पॉलिथिनच्या टाकीत टाकले जातात. त्यानंतर माशांना अन्न दिले जाते. मासे 75 टक्के अन्न त्यांच्या शरीरातून विष्ठेच्या रूपात बाहेर टाकतात. मग बायोफ्लॉक बॅक्टेरिया या स्टूलचे प्रोटीनमध्ये रूपांतर करण्याचे काम करतात. जे मासे खातात. त्यामुळे त्यांचा विकास वेगाने होतो.

MS Swaminathan । शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेले महान व्यक्ती एम. एस.स्वामीनाथन यांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *